पुणे(प्रतिनिधी)- मावळ तालुक्यातील (Maval Taluka) इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) कुंडमळा पूल (Kundmala Bridge) कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर रविवारपासून सुरू असलेली मोठी शोधमोहीम अखेर सोमवारी सायंकाळी ६ वाजता थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५१ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मृतांचा आकडा वाढलेला नाही. दरम्यान, जखमींपैकी ३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Kundmala bridge accident: Rescue operation ends after 25 hours)
कुंडमळा (Kundmala) येथील पूल दुर्घटनेनंतर रविवार दुपारी ३.३० वाजता सुरू झालेले बचावकार्य (Rescue Operation) तब्बल २५ तासांनंतर संपले. बचाव पथकांनी बोटीद्वारे इंद्रायणी नदीचे शेवटचे निरीक्षण केले असून, दिवसभरात नदीपात्रात कोणतीही व्यक्ती आढळली नाही. मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले (Surendra Navale) यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता बचावकार्य थांबवल्याची माहिती दिली. या शोधमोहिमेत अनेक संस्था आणि अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये वन्यजीव संस्था (Wildlife Organization), आपदा मित्र (Aapda Mitra), तसेच रोहा (Roha) व महाड (Mahad) येथील आपत्ती व्यवस्थापन संस्था (Disaster Management Organization) यांनीही भाग घेतला.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) या बचावकार्यात ३८ जणांना वाचवले. दुर्घटनाग्रस्त पुलाचा पाण्यात कोसळलेला भागही शोधमोहिमेदरम्यान बाहेर काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कुंडमळय़ामध्ये २०० ते ३०० मीटर अंतरावर सखोल शोधमोहीम राबवण्यात आली. स्थानिक जीवरक्षक संस्थेकडूनही सर्च ऑपरेशन (Search Operation) करण्यात आले. या शोधमोहिमेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनचाही (Drone) उपयोग करण्यात आला. तहसीलदार (Tehsildar) आणि प्रांताधिकारी (Prantadhikari) स्वतः या शोधमोहिमेत सहभागी झाले होते. मृत्यू आणि जखमींची माहिती, पुलाची स्थिती: दुर्घटनाग्रस्त चार मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. यापैकी तिघा मृतांची ओळख पटली आहे. दुर्घटनेतील ५१ जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.