स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल : अजित पवार

स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल
स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल

पुणे (प्रतिनिधी) — राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections), विशेषतः महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election) प्रभाग रचना कशीही असली तरी, ती स्वीकारण्याची मानसिकता आपण स्वीकारली पाहिजे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) (NCP – Ajit Pawar Faction) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी करतानाच, स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ असे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) २६ वा वर्धापन दिन (26th Anniversary) सोहळा मंगळवारी (Tuesday) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात (Shri Shivchhatrapati Sports Complex) साजरा झाला. सोहळ्याच्या समारोप प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), नवाब मलिक (Nawab Malik), खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), आमदार चेतन तुपे (Chetan Tupe), आण्णा बनसोडे (Anna Bansode), प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe), महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan), सहकोषाध्यक्ष संजय बोरगे (Sanjay Borge), प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे (Sanjay Tatkare), धीरज शर्मा (Dhiraj Sharma), सुरेश घुले (Suresh Ghule), योगेश बहेल (Yogesh Bahel), राजलक्ष्मी भोसले (Rajlaxmi Bhosale), माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre), सुभाष जगताप (Subhash Jagtap), प्रदीप गाराटकर (Pradeep Garatkar), माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande), सुभाष जगताप (Subhash Jagtap), प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), प्रमोद हिंदुराव (Pramod Hindurao) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील अखेर अटकेत; ७ दिवसांपासून होते फरार

पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २८ महापालिका (28 Municipal Corporations), २५ जिल्हा परिषद (25 Zilla Parishads), २८५ पंचायत समितीच्या (285 Panchayat Samitis) तसेच नगरपालिका व नगरपरिषद यांच्या निवडणुका होत आहेत. यात पक्षाकडून तरुण तरुणींना तसेच महिलांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. मुंबईमध्ये (Mumbai) एकचा प्रभाग तर अन्यत्र ४ चा प्रभाग असणार आहे. आता काहींचे मतप्रवाह वेगळे असतील पण आहे ती प्रभाग परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे असेही ते म्हणाले. राज्यात नव्याने १ कोटी सदस्य नोंदणीचे (1 Crore Membership Registration) उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून पुण्यात (Pune) दहा लाख व अन्य मोठ्या जिल्ह्यात पाच लाख सदस्य या चार महिन्यात नोंदविण्यसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. दरम्यान महायुती (Mahayuti) राज्यात सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात जेथे शक्य आहे तेथे युती (Alliance) म्हणून सामोरे जाऊ. पण जेथे शक्य नाही तेथे स्वबळावर व ताकतीने निवडणूक लढू असे सांगितले. पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार आहोत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (National Democratic Alliance) सहभागी होतानाच पहिल्या दिवसापासूनच सांगितले की, आम्ही आमची विचारधारणा सोडणार नाही हे सांगितले. अल्पसंख्याक (Minority), आदिवासी (Tribal), ओबीसी (OBC) समाजाला निवडणुकीत संधी दिली व ती कायम ठेवणार आहोत. आपण सत्तेचा फायदा हा जनतेच्या हितासाठी करत आहोत असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  महिला व बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून ५ चारचाकी गाड्यांचे वाटप

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. पण विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आपल्याला २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या. शेतकरी (Farmers) व लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून मतदान केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. पण जेथे शक्य नाही तेथे स्वतंत्र लढणार आहोत. अशावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वाधिक विजय मिळवणारा पक्ष राहू असे काम कार्यकर्त्यांनी करावे व हा संकल्प घेऊन, पक्षाच्या सदस्य नोंदींचा आकडा हा १ कोटीच्या वर न्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

सुनील तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही तेव्हा अजित पवार यांच्यावर टीका झाली पण मला विश्वास होता की विधानसभा निवडणुकीत यश मोठे मिळणार व ते मिळाले. आता गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे चार महिन्यानंतर येणाऱ्या या निवडणुकीला आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळाले असून, आता एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा महायुतीच्या नियमांना बाधा न आणता आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हा महिलांना ताकद व आत्मविश्वास दिला असल्याचे सांगितले. यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde), माजी मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode), नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) आदींची भाषणे झाली.

अधिक वाचा  तर अडलं कुठं? - राज ठाकरे

नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल अजित पवार म्हणाले… (Ajit Pawar on Absent Leaders)

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यात होत असला तरी राज्याच्या इतरही काही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. त्यामुळे मला समाधान आहे. मात्र, आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आधीच विदेश दौरा (Foreign Tour) ठरलेला होता. दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांचाही ३० दिवसांपूर्वी विदेश दौरा ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते काल देखील एका कार्यक्रमाला आले नव्हते. त्यामुळे आजच्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तीनही प्रमुख नेते उपस्थित राहू शकले नाहीत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

  • या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारा हा पहिला वर्धापन दिन असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यामुळे संकुलातील बॅडमिंटन हॉलही पूर्ण भरल्याने इतरत्र स्क्रीन लावून उपस्थितांना व्यवस्था करण्यात आली.
  • देशात पहिले महिला धोरण (Women’s Policy) शरद पवार (Sharad Pawar) यांनी आणले हे विसरता येणार नाही. तर महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेस (Congress) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी संपवली : सुनील तटकरे (Sunil Tatkare).
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love